आंबेगाव धरणाचे पाणी कमी झाल्याने लागले दिसू

घोडनदी व बुब्रा नदीच्या संगमावर पूर्वी हे गाव वसल होत
Jain Temple
Jain TempleSakal

फुलवडे ता. आंबेगाव - पुणे जिल्ह्यातील आंबेगाव हे गाव धरणाचे पाणी कमी झाल्याने दिसू लागले आहे. घोडनदी व बुब्रा नदीच्या संगमावर पूर्वी हे गाव वसल होत. पण १९७८ साली डिंभे धरणाच्या निर्मितीचे काम सुरू झाले आणि सन २००० साली धरणाचे काम पूर्ण होऊन दरवाजे बंद झाले. मेघराजाच्या गर्जनेत पावसाच्या धारांनी धरण भरायला सुरुवात झाली. आंबेगाव बरोबरच इतर अनेक गावे धरणामुळे स्थलांतरित झाली. खेळणारे चिमुकले हात, गावांतील गजबजलेल्या गल्ल्या, शाळेतील मुलांची घोकंपट्टी सर्व काही शांत होत गेले. जुनी घरे, वाडे, मंदिरे जमिनदोस्त झाली. आंबेगाव हेच तालुक्याचे मुख्य ठिकाण होते. हिरडा, तेल व मधाची मोठी बाजारपेठ याठिकाणी होती.

जुन्या पध्दतीच्या विटांमध्ये बांधलेल्या इमारती, विविध मंदिरे व चारही दिशांना पसरलेल्या सह्याद्रीच्या सुंदर रांगानी नटलेले होत. आज धरणातील पाणीच्या मोठा विसर्ग सुरू असल्याने पाण्याची पातळी खूप कमी झाला असून पाण्याखाली गेलेले जुने आंबेगाव गावठाण व येथील प्रसिध्द जैन मंदिर पूर्णपणे उघडे पडले आहे. तब्बल बावीस वर्षे पाण्याखाली राहूनही हे जैन मंदिर अजूनही सुस्थितीत आहे. मंदिरात आत-बाहेरून असलेली कलाकुसर, कोरीव काम व नक्षीकाम अजूनही जसेच्या तसे असलेले पाहायला मिळत आहे. गावठाणातील घरे व वाडे यांचे ढिगारे, पुर्वजांची थडगी, तेलाचे घाणे, मंदिर व जैन मंदिर पहायला मिळते. सध्या पाणी पूर्ण कमी झाले असल्याने जैन मंदिरापर्यंत व मंदिरामधेही जाता येत आहे.

दगड विटात असलेल्या या जैन मंदिरात जैन धर्मातील श्री. कल्याण पार्श्वनाथ, श्री. विमलनाथ, श्री. वासुपुज्य स्वामी यांनी जवळपास १०० वर्षांपूर्वी मंदिरासाठी ५१, ३१, ११ रुपये जिर्णोद्धाराकरीता दिलेल्या देणग्यांचा उल्लेख मंदिराच्या पूर्व भिंतीत संगमरवरी दगडावर कोरलेल्या शिलालेखात वाचायला मिळतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गज लक्ष्मीचे कोरलेले शिल्प असून मुख्य प्रवेशद्वाराच्या उंच माथ्यावर माता सरस्वतीची मूर्ती आहे. मंदिरातील खांबावरील कोरीव नक्षी, छतावरील गोलाकार सुरेख वर्तुळे, विविध कोरीवकाम व नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. मंदिराच्या पुर्वेकडून गावाला वीजपुरवठा करण्यात आलेले तीन लोखंडी खांब आजही तसेच उभे आहेत. येथील ओसाड पडलेले विटांचे ढिग पाहून स्थानिकांच्या डोळ्यात पाणी येते. आज आंबेगाव तालुक्याची दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. पण या निमित्ताने आंबेगाव पाण्याबरोबर आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com