पुण्यात पाणीकपात नाही - गिरीश बापट

पुण्यात पाणीकपात नाही - गिरीश बापट

पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पुणेकरांना पिण्याकरिता पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे येत्या जूनअखेरपर्यंत पुण्यात पाणीकपात नसेल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी (ता. ३) स्पष्ट केले. त्यामुळे तूर्तास पुण्याची पाणीकपात टळली आहे. मात्र, पुणेकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहनही बापट यांनी केले आहे.  

उन्हाची तीव्रता वाढत असल्याने धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यात पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाईची भीती आहे. धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन येत्या १५ जुलैपर्यंत पुणेकरांना पुरेल अशा पद्धतीने पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. हे नियोजन करताना पाणीकपातीची शक्‍यता होती. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री बापट यांनी पाण्यासह विविध प्रश्‍नांसंदर्भात महापालिकेत बैठक घेतली. आमदार योगेश टिळेकर, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

बापट म्हणाले, ‘‘सध्या धरणात पुणेकरांसाठी पुरेसे पाणी आहे. पुणेकरांना पाणी कमी पडू देणार नाही. प्रसंगी मृत साठाही वापरण्यात येईल. शिवाय, पाणीबचतीच्या उपाययोजनांकडे अधिक लक्ष देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. देखभाल- दुरुस्तीही वेळोवेळी करण्यात येईल, ज्यामुळे पाणी वाया जाणार नाही.’’

धरणातील पाणीसाठा 
५.२ अब्ज घनफूट (टीएमसी) 
मृत पाणीसाठा 
१ (टीएमसी)

ग्रामीण भागातील लोकांनाही मदत 
‘‘दुष्काळामुळे ग्रामीण भागात परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे येथील लोकांना मदत करण्यात येणार आहे. महापालिकेच्या निधीतून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या जातील, त्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना आयुक्त राव यांना केली आहे,’’ असेही बापट यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com