हुश्श! महाराष्ट्रात भारनियमन होणार नाही; पुरेशी वीज उपलब्ध

हुश्श! महाराष्ट्रात भारनियमन होणार नाही; पुरेशी वीज उपलब्ध

पुणे - कोयना वीजनिर्मितीचा चौथा टप्पा बंद झाला, तरी विजेच्या उपलब्धतेवर कुठलाही परिणाम होणार नाही. पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असल्यामुळे राज्यात कोठेही भारनियमन होणार नाही, असा दावा महावितरणने केला आहे. 

सद्यःस्थितीत उच्चतम विजेची मागणी 19,000 ते 19,500 मेगावॉट आहे. ती दीर्घकालीन करारांतर्गत औष्णिक वीज प्रकल्पातून व नवीकरणीय स्त्रोतांमधून पूर्ण करण्यात येत आहे. महावितरणकडे झीरो शेड्यूलमध्ये असलेले परळी औष्णिक प्रकल्पामधील संच क्र. 6, 7 व एनटीपीसी सोलापूर या औष्णिक प्रकल्पामध्ये असलेला वाटा मिळून एकूण 1,144 मेगावॉट इतकी अतिरिक्त वीज उपलब्ध आहे. तसेच पॉवर एक्‍सचेंजवर वीज उपलब्ध असल्यामुळे मागणी तेवढी उपलब्धता असल्याने कोयना वीजनिर्मिती केंद्रामधील टप्पा क्र. 4 मधून वीजनिर्मिती पूर्णपणे बंद झाली, तरीही राज्यात कोठेही भारनियमनासारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही, असेही महावितरणने कळविले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com