भामा आसखेडमधून सोडले उन्हाळ्यातील पहिले आवर्तन
आंबेठाण, ता.२७ : भामा आसखेड (ता.खेड) धरणातून चालू वर्षीच्या उन्हाळ्यातील पहिले आवर्तन आज (ता.२७) भामा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. सध्या हे आवर्तन आयसीपीओमधून १००० क्यूसेकने सोडले आहे.
चालू वर्षी पुरेसा पाऊस झाल्याने धरण १०० टक्के भरले होते.या धरणाची पाणीसाठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. धरणात सध्या एकूण पाणीसाठा ५.६९ टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा ५.२२ टीएमसी आहे. टक्केवारीत हा पाणीसाठा ६८.०१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षी आजच्या तारखेला हा साठा ७१.९१ टक्के होता. चालू वर्षात धरण क्षेत्रात १२९५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
भामा नदीवर आलेगाव पागा पर्यंत असणारे १८ बंधारे भरण्यासाठी हे आवर्तन सोडण्यात आले आहे. खेड,शिरूर,दौड आणि हवेली तालुक्यातील काही भागाला या आवर्तनाचा फायदा होणार आहे. भामा आसखेड धरण प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी डी.एस.डिग्गीकर, शाखा अभियंता नीलेश घारे-देशमुख आणि कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी माहिती दिली आहे.
02581
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.