मीना खोऱ्याचा पाणी प्रश्‍न सुटणार केव्हा?

मीना खोऱ्याचा पाणी प्रश्‍न सुटणार केव्हा?

मीना खोऱ्याचा पाणी प्रश्‍न सुटणार केव्हा?

जुन्नर, ता. १८ : येथील वडज उपसा सिंचन योजनेच्या कामाचे सर्वेक्षण होऊन आठ महिने उलटले तरी अद्याप त्याचा अहवाल तयार झाला नाही. यामुळे मीना खोऱ्याचा पाणी प्रश्न सुटणार केव्हा? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
गेली २८ वर्षांपासून मीना खोरे संघर्ष कृती समिती वडज धरणातून उजव्या कालव्याद्वारे उपसा सिंचन योजनेची मागणी करत आहे. यामुळे सावरगाव, निमदरी, खिलारवाडी परिसरातील सुमारे १२ ते १३ हजार एकर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. याच बरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. ह्या योजनेच्या सर्वेक्षणाचा आदेश २०१९ मध्ये निघाला परंतु ठेकेदाराची दिरंगाई व सरकारी कर्मचाऱ्याची अनस्था यामुळे प्रत्यक्षात सर्वेक्षण झालेच नाही. योजनेच्या सर्वेक्षणाच्या कामाचा सप्टेंबर २२ मध्ये प्रारंभ करण्यात आला. यामुळे मीना खोरे पाणी प्रश्न सुटण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र सर्वेक्षण होऊनही अहवाल तयार झाला नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
वडज धरणातून वडज उपसा सिंचनद्वारे पाणी मिळावे यासाठी येथील शेतकरी १९९२ पासून आंदोलने करत आहेत. मात्र सरकारी यंत्रणेकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. सावरगाव, खिलारवाडी, पाबळवाडी, काचळ वाडी, एकनाथवाडी, निळोबाराय नगर, शिवहरीनगर, दत्तनगर, विकासवाडी, धोंडकरवाडी, तुकारामवाडी या गावातील शेतकऱ्यांचा मूक आक्रोश सरकार ऐकणार आहे की नाही असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com