राहुल गांधी यांच्याविरुद्ध 
षडयंत्र ः मोहन जोशी

राहुल गांधी यांच्याविरुद्ध षडयंत्र ः मोहन जोशी

पुणे, ता. २३ ः आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींच्या प्रभावामुळे मोदी सरकार व भाजप सत्तेवरून फेकले जाणार आहे. त्यामुळेच गांधींवर विविध खटले दाखल करून व आरोप करून लोकसभेतून त्यांना अपात्र करणे हे षडयंत्र मोदी सरकार व भाजपने रचले आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी गुरुवारी येथे केला.
सुरत सत्र न्यायालयाने दिलेला निकाल हा त्याचाच एक भाग आहे. मात्र यामुळे आता देशातील काँग्रेस कार्यकर्ते पेटून उठले आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातून मोदी सरकारला काँग्रेस कार्यकर्ते निश्चित पराभूत करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि भाजप म्हणजे भारत देश नाही, असे असूनही लंडनमध्ये मोदी सरकारवर केलेली टीका म्हणजे भारतविरोधी बाब आहे असे सांगत भाजपने गेल्या आठवड्यात संसद बंद पाडली. हा देखील त्या षडयंत्राचा भाग आहे. त्यामुळे मतदार भाजपला नक्कीच धडा शिकवतील आणि पुण्यातील कसबा विधानसभा निवडणूक ही त्याचीच प्रचिती आहे, असेही जोशी यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com