स्वकर्तृत्व नसल्यामुळेच 
भाजपला आमदार फोडाफोडीत रस

काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचा आरोप

स्वकर्तृत्व नसल्यामुळेच भाजपला आमदार फोडाफोडीत रस काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचा आरोप

पुणे, ता. १६ : ‘‘सत्ताधारी पक्षाने देशातील महागाई, बेरोजगारी दूर करून स्वपक्षाचा जनाधार आणि विश्वसनीयता वाढविणे गरजेचे आहे. परंतु, भाजपचे वरिष्ठ नेते हे सरकारी आयुधे वापरून विरोधी पक्षांच्या आमदारांना फोडण्यात शक्ती खर्च करीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला.

भाजपचा देशातील सत्ताकाळ २०२४ मध्ये संपुष्टात येईल, असेही त्यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीतील काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, असे वक्तव्य नुकतेच केले. त्यांच्या या वक्तव्याचा तिवारी यांनी समाचार घेतला. तिवारी म्हणाले, राज्य सरकारतर्फे दिला जाणाऱ्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारांच्या कार्यक्रम पत्रिकेत विरोधी पक्षांतील नेत्यांच्या नावांचा उल्लेख नाही. ही सरकारची नैतिक दिवाळखोरी व मनमानी आहे. विरोधी पक्षाकडून होणारी टीका ही सत्तापक्षाच्या कामकाजात सुधारणा होण्यासाठीच समजली जात असते. लोकशाहीत सत्तेवर आल्यावर लोकहिताची कामे करून आश्वासने पूर्ण करणे हेच खरे राजधर्माचे पालन करणे असते. परंतु, हे सरकार शेतकरी, बेरोजगार तरुण आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासोबतच देशाच्या संपत्तीचे रक्षण करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे, असा आरोप तिवारी यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com