जिल्ह्यात बारा लाख शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिकांचे वाटप

जिल्ह्यात बारा लाख शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिकांचे वाटप

पुणे, ता. ७ : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८२ हजार माती नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १२ लाख ३१ हजार शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.
गेल्या सात वर्षांपासून ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात २०१५ ते २०१७ मध्ये १ हजार ८१३ गावांमधील एक लाख ७१ हजार ८०२ मातीचे नमूने तपासून चार लाख ६१ हजार ५३६ जणांना आरोग्य पत्रिका देण्यात आली. २०१७ ते १९ या वर्षात १ हजार ८०८ गावांमधील एक लाख ९१ हजार ३९० नमुने तपासून सात लाख ५३ हजार ८० पत्रिका देण्यात आल्या. २०१९-२० मध्ये १३ गावांतील ११ हजार ९४२ नमुने तपासून पत्रिकांचे वाटप करण्यात आले. सन २०२१-२२ मध्ये ३६ गावांतील ३६२० नमुने तपासून तेवढ्याच पत्रिका देण्यात आल्या. तर सन २०२२-२३ मध्ये आतापर्यंत २९८ गावांमधील ४१९० नमुने तपासून ४१९० पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.
ही योजना राबविण्यासाठी केंद्र सरकारकडून ६० टक्के, तर राज्य सरकारकडून ४० टक्के आर्थिक सहभाग दिला जातो. त्याअंतर्गत प्रत्येक तालुक्यात किमान सहा गावे निवडण्यात येतात आणि प्रत्येक गावातून किमान ९० मृद नमुने काढून त्याच्या जमीन आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना देण्यात येतात. या जमीन आरोग्य पत्रिकेच्या आधारे कमतरता असलेल्या सूक्ष्म मूलद्रव्य युक्त खतांच्या वापराबाबत प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात येते. जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीची रासायनिक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी, सूक्ष्म मुलद्रव्यांची कमतरता स्थिती आणि त्यानुसार पिकांना द्यायच्या खत मात्रेची माहिती प्रात्यक्षिक, प्रशिक्षणातून दिली जाते, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com