Itians
ItiansSakal

Itians Variable Pay : आयटीयन्स कर्मचाऱ्यांच्या परिवर्तनीय वेतनाला पुन्हा कात्री!

गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या परिवर्तनीय वेतनाला (व्हेरीएबल पे) लावली कात्री.

पुणे - वर्क फॉर्म होम, मुनलार्इटींग, कमी झालेले प्रोजेक्ट, प्रोजेक्ट अभावी होत असलेली पगार कपात या सर्वांतून बचावलेल्या आयटीयन्सला आता आर्थिक बाबींचा देखील झटका सहन करावा लागत आहे.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या परिवर्तनीय वेतनाला (व्हेरीएबल पे) कात्री लावली आहे. विशेष म्हणजे अनेक कंपन्यांनी या वर्षी व्हेरीएबल पे देण्यात येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

काय आहे स्थिती?

- कोरोनानंतर निर्माण झालेली आर्थिक स्थिती, रशिया-युक्रेन युद्ध यामुळे परदेशातून भारतात येणाऱ्या प्रोजेक्टची संख्या कमी झाली होती.

- त्यामुळे खर्चात कपात करण्यासाठी आयटी कंपन्यांनी नवनवीन युक्त्या शोधल्या होत्या.

- त्यात आयटीयन्सचा व्हेरीएबल पे १० ते ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला होता.

- यंदा त्यात कपात न करता थेट तो न देण्याच्या निर्णय अनेक कंपन्यांनी घेतला आहे.

- ज्या कंपनीत ही रक्कम देण्यात येत आहे, त्याची रक्कम पाच ते १० टक्क्यांपर्यंत आहे.

- त्याचा सर्वांत जास्त फटका सी १ ग्रेडच्या कर्मचाऱ्यांना बसत आहे.

Itians
Nivrutti Maharaj Indurikar : समाजसेवा करणारे योद्धा ग्रुप प्रत्येक गावात तयार झाले पाहिजेत

कोणतेही नियम नाहीत...

आयटीमधील बड्या कंपन्यांत आयटीयन्सला ए १, बी १, सी १ असे त्यांच्या कामानुसार ग्रेड दिले जातात. त्यातील सी दर्जाच्या कर्मचाऱ्यांना या वर्षाचा व्हेरीएबल पे मिळणारच नाही, असे कंपन्यांनी जाहीर केले आहे. व्हेरीएबल पे किती दिला जावा याबाबत कोणतेही नियम नाहीत.

व्हेरीएबल पे ठरविण्याच्या तीन पायऱ्या

१) कंपनीचे कामकाज, एखादा प्रोजेक्ट दिलेली टिम आणि त्यात टिममध्ये कार्यरत असलेले कर्मचारी, अशा तीन टप्प्याच्या कामकाजाचे मूल्यमापन करून व्हेरीएबल पे ठरवला जातो.

२) त्यातील कंपनीचे कामकाज म्हणजे कंपनीला किती फायदा झाला याचा विचार करून व्हेरीएबल पे किती द्यायचे हे ठरवले जाते. ३) त्यानंतर टिम व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या प्रगतीचा विचार केला जातो.

Itians
Baramati Crime: पणदरे येथील ग्रामपंचायत सदस्यावर खूनी हल्ला; गावात मोठा पोलिस बंदोबस्त

व्हेरीएबल पे म्हणजे काय?

कोणताही कर्मचारी कामावर घेताना त्याला ठराविक रकमेचे पॅकेज दिले जाते. त्याला कॉस्ट टू कंपनी (सीटीसी) म्हणतात. ही रक्कम जर १० लाख ठरली असेल तर त्यातील सुमारे आठच लाख (कंपनीनुसार ही रक्कम वेगळी असते) निश्‍चित पगार म्हणून दिले जातात. तर उर्वरित रक्कम ही व्हेरीएबल पेनुसार दिली जाते. कर्मचाऱ्यांचे काम किती समाधानकारक आहे त्यावर या रकमेतील काही रक्कम त्याला दिली जाते. काही कंपन्यांमध्ये व्हेरीएबल पे सीटीसीचा भाग नसतो. कंपनीनुसार या रकमेचे धोरण वेगवेगळे आहे.

Itians
Army MNS Admission : बारावीनंतर मुलींना लष्करात नोकरी करण्याची मिळणार संधी

मागील वर्षाच्या तुलनेत कंपनीच्या फायदा यंदा चांगली वाढ असेल तरच व्हेरीएबल पे देण्याचा निर्णय अनेक कंपन्यांनी केला आहे. नफ्यात १० टक्के जरी कपात झाली तरी व्हेरीएबल पेला कात्री लावण्यात आली आहे. एखाद्या प्रोजेक्टमध्ये तोटा झाला असेल तर लगेच पेमध्ये कपात करणे किंवा त्याला कात्री लावणे योग्य आहे, असे वाटत नाही.

- विनायक जोगळेकर, संस्थापक संचालक, रेझूमेक्स (आयटी कंपनी)

व्हेरीएबल पे किती द्यायचा किंवा द्यायचा नाही याचे मूल्यमापन हे वैयक्तिक पातळीवर झाले पाहिजे. चांगले कमी करीत असूनही पे मिळत नसेल तर जास्त कष्ट करून उपयोग होत नाही. काम न करीत असलेल्या कर्मचाऱ्यांमुळे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना फटका बसतो.

- कुणाल, आयटीयन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com