कवी कलश यांच्या ग्रंथाचे लवकरच प्रकाशन

कवी कलश यांच्या ग्रंथाचे लवकरच प्रकाशन

पुणे, ता. २५ ः छत्रपती संभाजी महाराज यांचे मित्र आणि मंत्रिमंडळातील मंत्री कवी कलश यांचे दुर्मिळ व अप्रकाशित काव्य ‘चंद कंवर री बात’ यावर ग्रंथ लिहिण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या याचे भाषांतर करण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत हे काम पूर्ण होणार असून लवकरच मराठी वाचकांना कवी कलश यांचे दुर्मिळ काव्य ग्रंथातून उपलब्ध होणार असल्याची माहिती इतिहास अभ्यासक व लेखक सुशांत उदावंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
इतिहासात कवी कलश यांच्याविषयी तसेच त्यांच्या साहित्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. गेल्या काही वर्षांपासून कवी कलश यांच्या साहित्यावर संशोधन सुरू आहे. १९६०च्या दशकात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. कृष्ण दिवाकर यांनी लिहलेल्या ग्रंथात कवी कलश यांच्याविषयी थोडे लिखाण झाले आहे. अधिक शोध घेतला असता या ग्रंथाचे हस्तलिखित राजस्थानमधील प्राच्यविद्या प्रतिष्ठान येथे असल्याची माहिती मिळाली. तेव्हा राजस्थान येथील प्राच्यविद्या प्रतिष्ठानमध्ये जाऊन त्या ग्रंथाची ‘स्कॅन कॉपी’ मिळविली. त्याआधारे हा ग्रंथ लिहिला असल्याचे सुशांत उदावंत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com