Electricity Supply
Electricity Supplysakal

Electricity Supply : पंधरा दिवसांची नोटीस दिल्याशिवाय वीजजोड तोडू नये ; सजग नागरिक मंचाकडून मागणी

‘वीज कायदा २००५’मधील कलम ५६ प्रमाणे कोणाचाही वीजजोड १५ दिवसांची नोटीस दिल्याशिवाय तोडता येत नाही. त्यामुळे महावितरणने सरसकट वीजजोड तोडण्याची कारवाई करताना, या नियमाचे पालन करावे,’ अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.

पुणे : ‘वीज कायदा २००५’मधील कलम ५६ प्रमाणे कोणाचाही वीजजोड १५ दिवसांची नोटीस दिल्याशिवाय तोडता येत नाही. त्यामुळे महावितरणने सरसकट वीजजोड तोडण्याची कारवाई करताना, या नियमाचे पालन करावे,’ अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.

आर्थिक वर्ष संपत आल्यामुळे महावितरणचे सर्व कर्मचारी थकबाकी वसुली मोहीम राबवत आहेत. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करत आहेत. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी त्यांना बिल भरण्याची संधी मिळावी, म्हणून वीज कायदा २००५मध्ये १५ दिवसांची नोटीस दिल्याशिवाय वीजजोड तोडता येत नाही, असे स्पष्ट म्हटले आहे.

ही तरतूद धाब्यावर बसवून परीक्षांच्या दिवसांत ग्राहकांना त्रास दिला जात आहे. यासंदर्भात अनेक ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करायला विरोध नाही. परंतु हे करताना कायद्याचे पालन करणेही आवश्यक आहे, अशी मागणी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्याकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com