पुणे - शहरातील वाहने सिग्नलवर अडकून पडू नयेत, यासाठी काही महिन्यांपूर्वी तीन रस्त्यांवर सिग्नल सिंक्रोनाईझ करण्यात आले होते. पण, पावसाळ्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीने प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली यंत्रणा बंद पडल्याने पुन्हा पूर्वीचे कोंडीचे दिवस आले आहेत.
मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही सिग्नल सिंक्रोनायझेशन झाले पाहिजेत, अशी चर्चा सुरू आहे. परंतु, अद्याप यात सुधारणा झालेली नाही.
पुणे महापालिकेने वाहतूक पोलिसांशी चर्चा करून सातारा रस्ता, सेनापती बापट रस्ता आणि गणेशखिंड रस्ता या तीन रस्त्यांवर सिग्नल सिंक्रोनाईझ केले होते. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना एक सिग्नल सुटला की त्या वेळी वाहनांना पटापट इतर सिग्नलही जाण्यास खुले मिळत होते, त्यामुळे प्रवासातील वेळ कमी लागत होता. कोंडीही कमी होत होती. पाऊस सुरू होताच येथील सिग्नल व्यवस्था कोलमडली. वेळेत वाहने सिग्नलहून पुढे जाऊ शकत नसल्याने येथील सिंक्रोनाईझेशन बंद करावे लागले. या ठिकाणी पोलिस वाहतूक नियमन करीत आहेत. पालिकेच्या विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीनिवास कंदूल यांनीही यास दुजोरा दिला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.