Datta Tol : ज्येष्ठ बालसाहित्यकार दत्ता टोळ यांचे निधन

ज्येष्ठ बालसाहित्यकार आणि अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे विश्वस्त दत्ता टोळ (वय ८९) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, भाऊ असा परिवार आहे
Datta Tol :
Datta Tol :sakal

पुणे : ज्येष्ठ बालसाहित्यकार आणि अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे विश्वस्त दत्ता टोळ (वय ८९) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, भाऊ असा परिवार आहे.

टोळ यांचा जन्म १९३५ मध्ये बार्शी येथे झाला. पुणे महापालिकेतून ते मुख्य लेखापाल पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी सुरुवातीच्या काळात ‘अमरेंद्र दत्त’ या टोपणनावाने लेखन केले. बाल आणि कुमारांसाठी त्यांनी विपुल लेखन केले. त्यांची ‘अंक मोजू या’, ‘अट्टी गट्टी फू’, ‘अमृतपुत्र विवेकानंद’, ‘

असे होते नामदार गोखले’, ‘आपले बापू’, ‘आळशांचा गाव’, ‘इतिहासातील सोनेरी पाने’ आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘वादळवाटेवरील सोबती’ हे त्यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले होते. मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी, यासाठी त्यांनी महापालिकेच्या शाळांमध्ये दीडशे बालवाचनालये सुरू केली होती.

अहमदनगर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांना केंद्र-राज्य सरकारचे ११ पुरस्कार मिळाले होते. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या विविध पदांवर ते कार्यरत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com