पवना धरणात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू

पवना धरणात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू

पवनानगर : पवन मावळातील पवनाधरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अमेय दिलीप राहते (वय २५) व तेजस रवि पांगम ( वय २२ दोघेही रा. काळाचौकी, अभ्युदयनगर, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार (दि.१५) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पवना धरण परिसरात पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडुन दोघांचा मृत्यू झाला. त्याठिकाणी लोणावळा ग्रामीणचे पोलिस घटनास्थळी वेळेत पोहचलेच नाही. त्यामुळे दुसऱ्या दोन पर्यटकांनी व या ठिकाणी आलेल्या इतर पर्यटकांच्या मदतीने दोघांना बाहेर काढून सोमाटणे येथील एका खाजगी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे.

आज रविवार असल्याने दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चार मित्र फिरण्यासाठी पवनाधरण परिसरात आज आले होते. पोहण्याचा आंनद घेण्यासाठी पाण्यात उतरुन पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलिस हवालदार सुनिल बाबर करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com