
पुणे : पुण्याहून धावणाऱ्या मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या वाढणार आहे. रेल्वे प्रशासनाने मुंबई-नांदेड वंदे भारत आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेससाठी एकत्र (इंटिग्रेशन) रेक वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला २० डब्यांचा रेक मिळणार आहे. या रेल्वेला सध्या १६ डबे आहेत. चार डबे वाढणार असल्याने तब्बल ३१२ प्रवाशांची सोय होणार आहे. २९ ऑगस्टपासून हा बदल लागू होणार आहे.