Walchandnagar News : सर्व राजकीय नेत्यांनी प्रयत्न केले; पण फक्त कंपनीच्या मालकाच्या शब्दाला मान देवून संप मागे...

वालचंदनगर कंपनीचे मालक चकोर दोशी, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांच्या शब्दाला मान देवून संप मागे घेतला.
Walchandnagar Company Strike Back
Walchandnagar Company Strike BackSakal

वालचंदनगर - वालचंदनगर कंपनीचे मालक चकोर दोशी, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांच्या शब्दाला मान देवून संप मागे घेतला आहे. संपावरती तोडगा काढण्यासाठी राजकीय नेत्यांनी प्रयत्न केल्याचे वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील आयएमडी कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष कपिल गायकवाड व सेक्रटरी शहाजी दबडे यांनी जाहीर केले.

वालचंदनगर कंपनीतील ६३० कामगारांनी रखडलेला वेतन वाढीचा करार त्वरित करावा तसेच थकीत देणी मिळावी यासाठी २२ नोंव्हेबर पासुन संपाला सुरवात केली होती. ४२ दिवस कामगारांचा संप सुरु होता. मंगळवार (ता. २) रोजी मंत्रालयामध्ये कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये संपावरती यशस्वी तोडगा निघाल्यानंतर गुरुवार (ता. ४) कामगार कामावरती जाणार आहे.

आज बुधवार (ता.३) रोजी कामगार संघटनेने संप मिटल्याची माहिती देण्यासाठी सर्व कामगारांनी एकत्र बोलवले होते. यावेळी कामगार युनियनच्या प्रतिनिधींनी कंपनीचे मालक चकोर दोशी व चिराग दोशी यांच्या शब्दाला मान देवून संप मागे घेतला असल्याचे जाहीर केले.

तसेच संप मिटविण्यासाठी देशाचे नेते व माजी कृषी मंत्री शरद पवार साहेब, खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी प्रयत्न केले. तसेच पियाजो कंपनील तुकाराम चौधर, जंक्शनचे सागर मिसाळ यांनी शरद पवार साहेब, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यामध्ये महत्वाची भुमिका बजावली असल्याचे कामगारांनी सांगितले.

आज संप मिटवत असताना संप कसा मिटला याची माहिती देत असताना गोंधळ होवू नये यासाठी वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

शरद पवार साहेब व खासदार सुप्रिया सुळे यांची महत्वाची भूमिका...

वालचंदनगर कंपनीतील कामगारांचा संप मिटविण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब,खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये कंपनीचे मालक चकोर दोशी, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी तसेच कामगार युनियनचे प्रतिनिधी यांच्यामध्ये मंगळवार (ता. २) सकाळी बैठक झाली होती.

संप मिटविण्यामध्ये शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचा मोलाचा वाटा असल्याचे कामगार संघटनेने सांगितले.तसेच सुप्रिया सुळे यांनी वालचंदनगरमध्ये कामगारांची भेट घेतली होती.

दत्तात्रेय भरणे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये मांडला कामगारांचा प्रश्‍न...

इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉरमिशनच्या माध्यमातून वालचंदनगरच्या कामगारांचा प्रश्न हिवाळी अधिवेशनामध्ये मांडून सभागृहाचे लक्ष वेधले होते. व कामगार मंत्री यांनी कामगारांच्या प्रश्‍नामध्ये लक्ष घालून कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती.तसेच वालचंदनगरच्या कामगारांनी भरणे यांच्या निवास्थानी भेट घेवून प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली होती.

हर्षवर्धन पाटील यांची भूमिका ठरली महत्वाची...

कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार (ता. २) रोजी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची भूमिका महत्वाची ठरली. पाटील यांनी प्रभावीपणे कामगारांची बाजू मांडली असल्याचे कामगारांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com