वारीनिमित्त दोन दिवस शहरात पाणीकपात रद्द

Water-Supply
Water-Supply

पुणे - संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात दोन दिवस मुक्कामी असणार आहे. त्यामुळे २६ आणि २७ जूनला शहरातील पाणीकपात रद्द करण्यात आली असून, या काळात पूर्ण वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे. 

खडकवासला धरण प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठी असल्याने शहरात २० ते २५ टक्के पाणीकपात सुरू आहे. देहू आणि आळंदी येथून दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर २६ जूनला पुण्यात येत आहेत. पालखी सोहळा शहरात २७ जूनला मुक्कामी असेल आणि २८ जूनला पहाटे दोन्ही पालख्या शहरातून मार्गस्थ होतील. या काळात लाखो वारकरी पुण्यात असतात. त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी दोन दिवस पुण्यातील पाणी कपात रद्द करून पूर्णवेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com