पश्‍चिम महाराष्ट्रात धरणांनी गाठला तळ

पश्‍चिम महाराष्ट्रात धरणांनी गाठला तळ


पुणे - यंदा मॉन्सून लांबणीवर पडल्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठा तळाला गेला आहे. ३० धरणांमध्ये दहा टक्‍क्‍यांहून कमी, तर १६ धरणांत शून्य टक्‍के पाणीसाठा आहे. त्यामुळे जून संपत आला तरी नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तसेच, पुरेशा पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

पश्‍चिम महाराष्ट्रातील भीमा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यातील धरणांमधील पाणीपातळी यंदा सरासरीपेक्षा खालावली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २३ ते २५ जूनदरम्यान वादळी पाऊस होईल. २६ जूननंतर पावसात खंड पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पूर्वमोसमी पावसाने काही भागांत हजेरी लावली; परंतु दमदार पाऊस झालेला नाही. जमिनीत ओलावा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पावसानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

पाणीपातळी खोलवर गेल्याने बोअरवेलची पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे पुणे विभागात ११९५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 

भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये पिंपळगाव जोगे, येडगाव, वडज, डिंभे, घोड, नाझरे, टेमघर धरणांत शून्य टक्‍के, विसापूर ०.२ टक्‍के, कळमोडी ०.२५, चासकमान ०.२१, भामा आसखेड ०.६२, वडिवळे ०.३६, आंद्रा १ टक्‍का, पवना १.२६, मुळशी ०.०५, माणिकडोह ०.६०, वरसगाव ०.७८, पानशेत १.५२, खडकवासला ०.२६, गुंजवणी ६.८१, नीरा देवघर १.३९, भाटघर ४.३९, वीर ४.१६, उजनी धरणात उणे ८८१.९३ टक्‍के पाणीसाठा  आहे.

पुणे विभागातील  टॅंकरची स्थिती 
जिल्हा     टॅंकर
पुणे :     ३१५
सातारा :     २९४
सांगली :     २२१
सोलापूर :     ३६४
कोल्हापूर :     १ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com