रोज १३५० दशलक्ष लिटर पाणी द्या

Water-Supply
Water-Supply

पुणे - चोवीस तास पाण्याचे आश्‍वासन देऊन सत्तेत आल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून २४ तासांतून एकदाच पाणी देऊन पुणेकरांवर पाणीकपात लादली आहे. आणखी पाणीकपात केल्यास नागरिकांचे प्रचंड हाल होतील. त्यामुळे राजकीय पक्षांच्या आश्‍वासनावरील विश्‍वास पूर्णपणे उडेल, हे लक्षात घेता येत्या १५ जुलैपर्यंत शहराला दररोज १३५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी मिळेल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सजग नागरिक मंचाने पालकमंत्री गिरीश बापट यांना पत्राद्वारे केले आहे.

शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी पालकमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यानुसार खडकवासला धरणसाखळीत सध्या १७.६८ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यापैकी पुढील सात महिन्यांत बाष्पीभवनामुळे १.७३ टीमएसी पाणी वाया गेल्यास १६ टीएमसी पाणी शिल्लक राहते. पुणे शहराला प्रतिदिनी १३५० एमएलडीनुसार येत्या १५ जुलैपर्यंत पाणीपुरवठा केल्यास त्यातील १०.७५ टीएमसी पाणी संपेल. अर्धा टीएमसी पाणी पंढरपूर वारीसाठी राखून ठेवल्यास उर्वरित ४.७५ टीएमसी पाणी सिंचनासाठी शिल्लक राहील. यामध्ये रब्बी हंगामासाठी पावणेतीन टीमएसी आणि उन्हाळी हंगामासाठी दोन टीएमसीचे आवर्तन देता येईल. तसेच मुंढवा जॅकवेलमधून दररोज ५५० एमएलडी पाणी सिंचनासाठी घेतल्यास पुढील साडेसात महिन्यांत आणखी चार पाणी सिंचनासाठी उपलब्ध होईल. याचाच अर्थ सिंचनासाठी एकूण पावणेनऊ टीएमसी पाणी उपलब्ध होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com