Water supply is provided for the Warkaris by the Khadakwasla Irrigation Department
Water supply is provided for the Warkaris by the Khadakwasla Irrigation Department

वारकऱ्यांना बसणार नाही पाणीटंचाईची झळ

लोणी काळभोर : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना लोणी काळभोर ते पाटस दरम्यान पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी गुरुवारी (ता. 26) सकाळी 7 वाजल्यापासून खडकवासला धरणातून उजव्या कालव्यात सुमारे सातशे क्युसेक या क्षमतेने पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता पांडुरंग शेलार यांनी दिली. 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुणे शहरातील दोन दिवसाचा मुक्काम संपवुन शुक्रवारी (ता. 28) दुपारी ग्रामिण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोर येथे दाखल होणार आहे. खडकवासला धरणातून उजवा कालव्यात पाणी सोडणे बंद केल्याने, लोणी काळभोर, उरुळी कांचन, यवत, पाटससह पुणे-सोलापुर महामार्गालगतच्या काही गावांना मागील काही दिवसापासून मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच पालखी सोहळा लोणी काळभोर, यवत व वरंवडला मुक्कामी येणार असल्याने वारकऱ्यांना पाणी पुरवठा करणे अवघड झाले होते. या पार्श्वभुमीवर खडकवासला पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता पांडुरंग शेलार यांच्याशी संपर्क साधला असता, शेलार यांनी वरील माहिती दिली. 

याबाबत अधिक माहिती देतांना पांडुरंग शेलार म्हणाले, खडकवासला धरणातुन उजव्या कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर लोणी काळभोर, उरुळी कांचनसह अनेक गावांच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजना अवंलबुन आहेत. मात्र चालु वर्षी खडकवासला धरण साखळीत पुरेसे पाणी नसल्याने, उजल्या कालव्यात पाणी सोडणे बंद केले आहे. यामुळे पालखी मार्गातील लोणी काळभोर, उरुळी कांचन, यवत, पाटस या गावांच्या पाणीपुरवठा व्हावा यासाठी पाटबंधारे विभागाने गुरुवार पासून चार दिवस कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पाचशे ते सातशे क्युसेक या वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे. पालखी पाटस टोलनाक्यावरुन पुढे जाताच, पाणी बंद करण्यात येणार आहे. वारकऱ्यांना पाणी टंचाई जाणवू नये यासाठी वरील निर्णय घेण्यात आल्याचेही शेलार यांनी यावेळी स्पष्ट केले. 

पाटंबंधारे खात्याचे आभारी आहोत - उरुळी कांचन ग्रामस्थ 
दरम्यान खडकवासला धरणातुन उजव्या कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत बोलतांना उरुळी कांचनचे माजी उपसरपंच सुनिल कांचन व ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र बडेकर म्हणाले, उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा पुर्णपणे उजव्या कालव्यावर अवलंबून आहे. मागील काही दिवसापासून कालव्यातील पाणी बंद झाल्याने, उरुळी कांचन ग्रामस्थांना मोठ्या पाणी टंचाईला सामोरी जावे लागत होते. त्यातच शनिवारी दुपारी पालखी दुपारच्या विसाव्यासाठी येणार असल्याने, वारकऱ्यांना कसा पाणी पुरवठा करावयाचा हा मोठा प्रश्न ग्रामपंचायतीपुढे उभा राहिला होता. मात्र गुरुवारपासून चार दिवस कालव्यात पाणी सोडण्यात येणार असल्याने, ग्रामपंचाती समोरील मोठा प्रश्न सुटला आहे. पाटबंधारे खात्याच्या पाणी सोडण्याच्या निर्णयाबद्दल उरुळी कांचन ग्रामस्थ आभारी आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com