यवतचा पाणीप्रश्न अखेर मार्गी

Pani
Pani

यवत (पुणे) : यवत गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी पाणीयोजना मंजूर करण्यात आली आहे. यासाठी सरकारने तेरा कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती सरपंच रझिया तांबोळी यांनी दिली.

दौंड तालुक्‍यातील मोठ्या गावांपैकी एक असलेल्या यवत गावची पेयजल योजनेची मागणी मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. सरपंच रझिया तांबोळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया बाकी असून ती पुढील आठवडाभरात पूर्ण होईल, असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. यवतपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या माटोबा तलावात जॅकवेल खोदण्यात येणार असून या जॅकवेलपासून जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. हे पाणी शुद्धीकरण करून ते विविध ठिकाणच्या सात टाक्‍यांमध्ये वितरित होणार आहे. त्याचे घरगुती व सार्वजनिक नळांद्वारे वाटप करण्याचे नियोजन आहे. ही योजना पूर्णत्वास गेल्यास पुढील काळात यवत गावाला पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही.
यवत गावची लोकसंख्या सुमारे सुमारे वीस हजारांवर पोचली आहे. या लोकसंख्येला टंचाईच्या काळात पाणी पुरवठा करताना ग्रामपंचायतीची दमछाक होत आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले. या योजनेमध्ये जलशुद्धीकरण, एक ते पाच लाख लिटर क्षमता असलेल्या विविध सात टाक्‍या, जलवाहिनी, पंप, जॅकवेल, पंपहाऊस यांचा प्रामुख्याने समावेश आहे. राजकीय विरोध विसरून आमदार राहुल कुल यांनी सरकार दरबारी या योजनेसाठी मोलाचे सहकार्य केल्याचे सरपंच तांबोळी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com