पावसाळ्यातही ‘टॅंकर’ला सुगीचे दिवस

water-tanker in pimpri
water-tanker in pimpri

पिंपरी - समान पाणीवाटपाचे चुकलेले नियोजन, २४ तास पाणीपुरवठ्यासाठी शहरात सुरू असलेले जलवाहिनी टाकण्याचे काम, पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंत्यांच्या झालेल्या बदल्या, या व अशा अनेक कारणांमुळे पवना धरण पूर्ण भरूनही नागरिकांना पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. त्यातूनच ऐन पावसाळ्यातही टॅंकर व्यवसायाला सुगीचे दिवस आले असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. 

महापालिकेने १९ ऑगस्टपासून आठवड्यातून एक दिवस पाणीकपात बंद करण्याचा निर्णय घेतला, तर शहराच्या चिंचवड, आकुर्डी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख या भागांमध्ये अन्य दिवशीही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. 

असे आहे गणित...
शहरात २५ टॅंकर व्यावसायिक असून, एकूण शंभर टॅंकर आहेत. एका टॅंकरसाठी साधारणपणे ८५० ते १२०० रुपये आकारले जातात. त्यातून व्यावसायिकाला एका टॅंकरमागे १०० ते ३०० रुपये नफा मिळतो. उन्हाळ्यात एका टॅंकरच्या दिवसाला साधारणपणे १० ते १२ फेऱ्या होतात. त्यामुळे एका टॅंकरमागे व्यावसायिकाला दिवसाला एक हजार ते १२०० रुपयांचा नफा होतो. यानुसार शंभर टॅंकरचा दिवसाचा नफा एक लाख २० हजार रुपये, तर महिन्याला ३६ लाख रुपयांपर्यंत जातो. या हिशेबाने टॅंकरचालक लाखो रुपये कमावत असून, अनेक टॅंकर व्यावसायिकांच्या स्वतःच्या विंधन विहिरी, तर काहीजणांचे ‘आरओ प्लांट’ही आहेत. 

अभियंत्यांच्या  बदल्याही कारणीभूत
बदली होऊन गेलेल्या कनिष्ठ अभियंत्यांना जलवाहिन्यांचे ठिकाण, उंच-सखल भाग, परिसरनिहाय लोकसंख्येची घनता, त्यानुसार पाण्याचा दाब किती असावा, याबाबत माहिती होती. मात्र, दोन महिन्यांपूर्वी बदलीवर आलेल्या नव्या अभियंत्यांना पाणीपुरवठ्याबाबतची कोणतीही माहिती नाही, त्यातूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कटले असून, माहितीअभावी समस्या सोडविण्यात वेळ जात असल्याचे चित्र आहे. 

२४ तास योजना संथ
महापालिकेच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून हाती घेतलेल्या २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चूनही अद्याप काम पूर्ण झालेले नाही. या योजनेतील कामासाठी ठिकठिकाणी जलवाहिन्या बदलण्यात येत आहेत, त्यासाठीही पाणीपुरवठा बंद ठेवावा लागत असल्याने नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. 

कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्यांमुळे फार मोठी समस्या उद्‌भवलेली नाही. ही समस्या तात्पुरती आहे. पावसाळ्यामुळे खोदकाम करण्यास बंदी असल्याने जलवाहिन्यांची कामे करता येत नाहीत.
- रामदास तांबे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com