नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षांचं होणार काय? सरकार काय घेणार निर्णय?

students
students

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करत पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता राज्य सरकार इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मार्च २०२० पासून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा बंद असल्यातरी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन तर काही ठिकाणी ऑफलाइन शिक्षण सुरूच होते. या काळात अनेकांपर्यत शिक्षण पोचू शकले नाही. अशा परिस्थितीत सरसकट सर्व विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे योग्य राहणार नाही, अशी मत मांडत राज्य सरकारने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मूल्यमापनाशिवाय उत्तीर्ण करत पुढील वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, आता या निर्णयानंतर राज्य सरकार इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेणार, या प्रतीक्षेत विद्यार्थी, शिक्षक, पालक असल्याचे दिसून येते.

हेही वाचा - पुण्यात रेमडिसिव्हिरचा पुन्हा काळा बाजार!
इयत्ता नववीचे विद्यार्थी दहावीला आणि अकरावीचे विद्यार्थी बारावीला जाणार आहेत. त्यामुळे करिअरचा टर्निंग पाँइट असणाऱ्या या परीक्षा शैक्षणिक पाया भक्कम करणाऱ्या आहेत. मागील वर्षी अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे निकाला लावण्यात आले आणि त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला होता. यंदा विशेषत: नववीच्या काही विद्यार्थ्यांचे पूर्ण वर्ष ऑनलाइन शिक्षणात, तर काही ठिकाणी ऑफलाइन शिक्षणात गेले. तर अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबल्याने विद्यार्थ्यांचे (ऑनलाइन/ऑफलाइन) शिक्षण डिसेंबर-जानेवारीत सुरू झाले. अकरावीचा अभ्यासक्रम अद्याप शिकवून पूर्ण झालेला नाही. अशा वेळी सरकारची इयत्ता नववी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.


‘‘अकरावीत गेलेल्या विद्यार्थ्यांचे  भवितव्य सरकारच्या निर्णयावर ठरणार आहे. शहरात अकरावीचे ऑनलाइन वर्ग डिसेंबर-जानेवारीमध्ये सुरू झाले आहेत. शैक्षणिक वर्ष संपत असले असले तरीही अकरावीचा केवळ ४० टक्के अभ्यासक्रम अद्याप शिकवून पूर्ण झाला आहे. त्यात शालेय शिक्षणाव्यतीरिक्त कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाचा आवाका अधिक विस्तारलेला आहे. अशा परिस्थितीत अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकार काय निर्णय जाहीर करते, हे पाहणे महत्त्वाचे  ठरणार आहे.’’
- पूजा वानखेडे, पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com