मोदीजी.. शेतकऱ्यांना समजलंय.. आता वेळ निघून गेलीये!

yogi.jpg
yogi.jpg

पुणे : ''शेतकऱ्यांचे प्रश्न हा देश पातळीवरील प्रश्न आहे. 30 वर्षांनंतर आज शेतकऱ्यांचा प्रश्न केंद्रस्थानी आला आहे. शेतकऱ्यांचा प्रश्नाच्या आधारवर पहिल्यांदा देशाच्या लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संघर्षाला समर्थन माझे आहे. देशभरातील शेतकऱ्यांचे समर्थन त्यांच्या पाठिशी आहे.'' अशी भूमिका अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे प्रणेते योगेंद्र यादव यांनी आज पुण्यात झालेल्या शेतकरी मोर्चामध्ये ते सहभागी झाले त्यावेळी मांडली.

शेतकऱ्यांचा प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, ''ऑल इंडिया किसान समन्वयच्या माध्यमातून देश पातळीवरील शेतकऱ्यांचे संघटना बनविल्या तेव्हापासून शेतकरी मोर्चाला नवे वळण प्राप्त झाले. त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न निवडणुकांसाठी महत्त्वाचा झाला. छत्तीसगढ, राजस्थान, मध्यप्रदेश मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम दिसून आला तेव्हा सरकाराला जाग आली. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक वाक्यात शेतकऱ्यांचा उल्लेख येतो, आता नवीन पॅकेज दिले जाते...पण आता वेळ निघून गेली आहे. शेतकऱ्यांना हे सरकार शेतकरी विरोधी सरकार असल्याचे समजले आहे.''

एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या आसूडाच्या कडकडाटात अलका टॉकीज चौकातून मोर्चाला सकाळी सुरवात झाली होती. पुण्यात टिळक चौकात राज्यभरातून सुमारे एक हजार शेतकरी उपस्थित होते. यावेळी मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांची जोरदार घोषणा बाजी चालू होती. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटनेचा सरकार विरोधात विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. राजू शेट्टी यांनी डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून मोर्चाला सुरवात केली. मोर्चामध्ये राजू शेट्टींसह अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे प्रणेते योगेंद्र यादव, स्वाभिमाने शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर देखील सहभागी झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेला मोर्चा साखर आयुक्त कार्यालयावर अडविण्यात आला. दरम्यान मोर्चामुळे फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर काही काळ वाहतूक बंद होती. त्याचा जंगली महाराज रस्त्यावर वाहतूकीचा ताण येत होता. मोर्चा पुढे गेल्यानंतर मागील बंद वाहतूक सोडण्यात आली त्यामुळे वाहतूक कोंडी तासभर सुरळीत झाली.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com