मुंबई - कोरोनामुळे फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकार काय उपाययोजना करतंय, याकडे देशाचं लक्ष लागलं होतं. आज सकाळी 11 वाजल्यापासून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटच्या सादरीकरणास सुरवात केली. 'आत्मनिर्भर भारतासाठी बजेट' असं या बजेटचं वर्णन अर्थमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी सादर केलेले हे तिसरे बजेट आहे. अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेट नंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बजेटवर टीका करताना म्हटले की, सामान्य लोकांच्या हातात पैसे आणण्याऐवजी मोदी सरकारने देशाची मालमत्ता त्यांच्या उन्मत्त भांडवलदार मित्रांच्या हातात सोपवण्याचा कट आखला आहे. राज्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील या बजेटवर टीका करत म्हटले की, ''अर्थमंत्र्यांचे आजचे अर्थसंकल्पीय भाषण ऐकून, हा निवडणुकीचा जाहीरनामा होता की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्प पत्र, हाच प्रश्न पडला आहे''.
बाळासाहेब थोरात यांनी काय म्हटले?
-------------------------------------------
mumbai latest political news balasaheb thorat criticize on budget 2021
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.