

Budget Leak Explained: Why India Changed Its Budget Security After 1950
esakal
Budget Leak of 1950 : भारतामध्ये दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी 'हलवा सेरेमनी' पार पडते आणि अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांना बजेटच्या कामासाठी बाहेरील जगापासून पूर्णपणे तोडून एका बंदिस्त परिसरात ठेवले जाते. ही प्रक्रिया जणू काही गुप्तहेर चित्रपटासारखी वाटते. यावेळीही ही प्रक्रिया पार पडली. मात्र इतकी कडक गोपनीयता का पाळली जाते, यामागे एक मोठं कारण आहे.
इतिहासात असा एक काळ आला होता, जेव्हा देशाचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच लीक झाला होता. या घटनेमुळे केवळ सरकारचीच नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेची मोठी अडचण झाली होती. इतकंच नव्हे, तर यामुळे तत्कालीन अर्थमंत्र्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. बजेट २०२६ च्या पार्श्वभूमीवर हा किस्सा प्रत्येक भारतीयासाठी जाणून घेण्यासारखा आहे.