salary
sakal
नवी दिल्ली - भारतातील कर्मचाऱ्यांच्या पगारात पुढील वर्षी नऊ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. पगारवाढीवर परिणाम करणाऱ्या प्रमुख घटकांमध्ये वैयक्तिक कामगिरी, महागाई आणि नोकरीच्या बाजारपेठेतील स्पर्धात्मकता यांचा समावेश आहे, असे जागतिक सल्लागार संस्था मर्सरच्या ‘टोटल रेम्युनरेशन सर्व्हे २०२६’ अहवालात म्हटले आहे.