

Union Budget 2026
sakal
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी (ता. १) एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ या आर्थिक वर्षासाठी (२०२६-२७) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा त्यांचा सलग नववा अर्थसंकल्प असून, रविवारी सादर होणारा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात देशाच्या विकासाचा वेग टिकवून ठेवण्यासाठी, वित्तीय शिस्त राखण्यासाठी आणि जागतिक व्यापार संघर्षांपासून अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी आवश्यक सुधारणांचा समावेश असेल, अशी अपेक्षा आहे.