P Chidambaram: अर्थव्यवस्थेबद्दल पी चिदंबरम यांचे सूचक वक्तव्य; म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेचा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार गरीब लोकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Indian economy is growing, but the sequential quarter growth is declining: P Chidambaram
Indian economy is growing, but the sequential quarter growth is declining: P ChidambaramSakal

P Chidambaram : भारताचा विकास होत आहे, मात्र तिमाही विकास दर घसरत आहे आणि अर्थव्यवस्था मंदावत आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी सांगितले. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार गरीब लोकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

भारतीय अर्थव्यवस्था मंदावली आहे : पी चिदंबरम

यावर बोलताना पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे की, "वास्तविकता अशी आहे की वाढ होत आहे, परंतु तिमाही वाढ किंवा अनुक्रमिक तिमाही वाढ कमी होत आहे, म्हणजे - पहिल्या तिमाहीत 13.2 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 6.3 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 4.4 टक्के आहे.

आणि चौथ्या तिमाहीत, माझा अंदाज आहे की तो 4.1 टक्के आणि 4.3 टक्क्यांच्या दरम्यान असेल." चिदंबरम 'इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह'मध्ये म्हणाले, "म्हणून, हा एक घसरलेला तिमाही विकास दर आहे, याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्था मंदावली आहे."

जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताच्या झपाट्याने होत असलेल्या वाढीबद्दल विचारले असता, माजी अर्थमंत्री म्हणाले, "मी आंधळ्यांचा राजा आहे, असे म्हणण्यात काही अभिमान नाही. चीन भारतापेक्षा साडे पाचपट मोठा आहे. त्यामुळे दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आपण अजूनही अत्यंत गरीब देश आहोत."

Indian economy is growing, but the sequential quarter growth is declining: P Chidambaram
Adani Group : ''अदानींनी महाराष्ट्र, राजस्थानमध्ये वीजनिर्मितीत १० हजार कोटींचा घोटाळा केला''

वित्तीय प्रोत्साहन न देऊन भाजप सरकारने चूक केली : पी चिदंबरम

चिदंबरम यांनी असेही म्हटले आहे की भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील एनडीए सरकार कोरोनाच्या काळात आर्थिक प्रोत्साहन दिले नाही. सरकारने आथिर्क प्रोत्साहन न देऊन चूक केली. त्यामुळेच तीन कोटी लोकांना इतर शहरे आणि राज्यांमधून बिहार आणि उत्तर प्रदेशात परत जावे लागले.

मोदी सरकारला कोणत्या गोष्टीचे श्रेय देतील असे विचारले असता चिदंबरम म्हणाले की, तूट आणि कर्ज व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्याचे श्रेय ते या सरकारला देतील. याचे श्रेय द्यायला मला कोणताही संकोच वाटत नाही, मात्र मी एवढेच सांगतो की अजून बरेच काही करायचे आहे, असे चिदंबरम म्हणाले.

यावेळी नीलकंठ मिश्रा काय म्हणाले :

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य नीळकंठ मिश्रा म्हणाले की, सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जागतिक आर्थिक गोंधळात भारताला स्थिर अर्थव्यवस्था म्हणून पाहिले जात आहे.

तर त्याने विदेशी गुंतवणूकदार, परदेशी कंपन्यांना आकर्षित केले पाहिजे. जे कौशल्ये आणि तंत्रज्ञान आणू शकतात ते आणा. मिश्रा यांनी असा युक्तिवाद केला की तिमाही जीडीपीची आकडेवारी अत्यंत चुकीची आहे.

Indian economy is growing, but the sequential quarter growth is declining: P Chidambaram
अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com