Ajit Pawar: जानेवारी महिन्यात अयोध्येत श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. दरम्यान राज्यासह देशातील भाविक अयोध्येला जात आहेत त्यांच्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
आज पार पडत असलेल्या राज्याच्या अंतरिम बजेटमध्ये अजित पवारांनी यासंबधीची मोठी घोषणा केली, श्रीनगर आणि अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्यात येणार आहे. यासाठी ७७ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. अजित पवारांच्या या घोषणेनंतर विधीमंडळात जय श्रीरामच्या घोषणा सुरू झाल्या.
बजेट सादर करत असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची घोषणा केली केली. त्याचबरोबर जम्मू काश्मिरमध्ये महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे.
राज्यातील पर्यटकांना आणि भाविकांना किफायतशीर दरामध्ये उत्तम सुरक्षित सुविधा पुरवण्यासाठी श्रीनगर जम्मू काश्मीर आणि अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी राज्य सरकारने अगदी मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून घेतल्या आहेत. यासाठी ७७ कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित आहे. अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.