
भारतीय रिझर्व्ह बँकेने मृत खातेदारांच्या बँक खाती आणि लॉकरवरील दाव्यांची प्रक्रिया सर्व बँकांसाठी एकसंध व सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या धोरणामुळे नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदारांना पूर्वीपेक्षा कमी कागदपत्रांत आणि वेळेत आपले हक्क मिळवता येणार आहेत.
हा निर्णय विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी दिलासा देणारा ठरेल, जिथे अशा प्रकरणांत आजवर अडचणींचा सामना करावा लागत होता.
RBI New Rules 2025: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँक ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आता खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना बँकेशी संबंधित कामांसाठी अवघड प्रक्रियेचा सामना करावा लागणार नाही. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 6 ऑगस्ट 2025 रोजी मौद्रिक धोरण समितीच्या (MPC) बैठकीनंतर ही माहिती दिली.