

सण-उत्सवांचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच देशभरात साखरेच्या किरकोळ दरात मोठी घट झाली आहे. २२ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या २२ दिवसांच्या कालावधीत प्रमुख शहरांमध्ये साखरेचे दर प्रति किलो १२ ते १६ रुपयांनी कमी झाले आहेत. ‘चिनीमंडी’कडून उपलब्ध आकडेवारीनुसार, मुंबईत साखरेचा दर ६८ रुपयांवरून ५४ रुपये प्रति किलो, तर रांचीमध्ये ७० रुपयांवरून ५५ रुपये प्रति किलो झाला आहे. कोलकाता आणि गुवाहाटीमध्येही साखरेच्या दरात सुमारे १५ रुपयांची घट नोंदवली गेली आहे.