

Financial Freedom for Youth: Start Early to Retire Stress-Free with Expert Advice
Sakal
नंदिनी वैद्य, ‘सेबी’ नोंदणीकृत, गुंतवणूक सल्लागार
जेव्हा व्यक्ती नोकरी/व्यवसाय सुरु करते, तेव्हा इतर आर्थिक गरजांव्यतिरिक्त एक महत्त्वाचा उद्देश असतो तो म्हणजे मी आतापासून किती पैसे साठविले तर माझे निवृत्तीनंतरचे जीवन सुखी होईल. सामान्यतः गुंतवणूकदारांमध्ये असे दिसून येते, की उत्पन्न वजा खर्च करून जे उरते त्याची गुंतवणूक करायची आणि ती जशी वाढत राहील तोच आपला निवृत्तीच्या वेळी असणारा निधी. यामध्ये मुला-मुलींची शिक्षणे, लग्न, आजारपण हे सर्व असतेच. याचा परिणाम असा होतो, की ज्या काळात म्हणजे निदान ३०-३५ वर्षे व्यक्ती कमावती असते, त्यावेळी निश्चित असे आर्थिक नियोजन नसल्याने आपल्या निवृत्तीच्या वेळी किती निधी पुरेसा ठरेल, याचा अंदाजच बांधू शकत नाही, परिणामी आयुष्यभर गोंधळलेली अवस्था राहते. आपल्याला आपले जीवनमान सुखी, समाधानी हवे असेल तर असे गोंधळलेले आयुष्य जगण्यात काही मजा नाही.