

Maharashtra political turmoil
sakal
जगात काहीही उत्पात घडो, खेळ चालूच राहिला पाहिजे, द शो मस्ट गो ऑन…हे जुन्या काळातील सर्कशींचे ब्रीदवाक्य होते. पोटापाण्यासाठी जोखीम पत्करून उंच पाळण्यांवर जीवघेण्या कसरती करताना सर्कसपटूंना थांबणे शक्य नसे. याचे कारण कसरती केल्या नाहीत, तर पोटाची खळगी कशी भरायची, हा ‘उद्या’चा प्रश्न आ वासून समोर उभा असे. आपल्याकडच्या राजकारणातही हे धर्मवाक्य बनून गेले आहे, असे दिसते. गेल्या आठवडाभरात महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडले, ते अभूतपूर्व आहे. शेक्सपीअरच्या शोकांतिकाही फिक्या पडतील, असे गडद प्रसंग या काळात घडले.