Iran Israel War
sakal
भारताच्या ऊर्जासुरक्षेचा प्रश्न पश्चिम आशियातील युद्धामुळे ऐरणीवर आला आहे. वेळीच नियोजन करण्यात आलेल्या अपयशामुळे अनिश्चिततेचे धक्के बसत आहेत.
अमेरिका-इस्राईलने इराणच्या विरोधात सुरू केलेल्या युद्धाच्या भडक्याने प्रामुख्याने इराणमध्ये विध्वंस सुरू असला तरी त्याच्या झळा दूरवर दाह निर्माण करताहेत. भारतात इंधनाच्या प्रश्नावरून जे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, ते याचेच उदाहरण. जगाचा वीस टक्के इंधनव्यवहार करणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीचा ‘अण्वस्त्रा’प्रमाणे वापर इराण करणार हे भारताला ठाऊक होते.