पाऊसमान चांगले झाल्यावर वाहने व सोने वगैरेंच्या खरेदीला ग्रामीण भागात उठाव मिळतो, हे वास्तव असले तरी त्या भागातील एक वर्ग अद्यापही दारिद्र्यात खितपत पडलेला आहे. या दरीकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्ध, संघर्ष, मंदीचे वातावरण यांचे मळभ दाटलेले असताना, व्यापारयुद्धाचे खणखणाट ऐकू येत असताना भारताच्या आर्थिक विकासाबाबत निर्माण झालेला आशावाद हा नक्कीच लक्ष वेधून घेणारा आहे. त्याचा एक ठळक घटक अर्थातच येऊ घातलेल्या मॉन्सूनच्या उत्तम कामगिरीचा अंदाज हा आहे.