
शिक्षण क्षेत्राने संपूर्णतः कात टाकावी, असे वाटत असेल तर या पाया मजबुतीपासून सुरवात करावी लागेल.
प्रत्येक क्षेत्रात काळानुरूप बदल करणे आवश्यकच असते. जगभर तंत्रविज्ञानात वेगाने होत असलेली प्रगती, त्यामुळे उत्पादनतंत्रात आणि रचनेत संपूर्णपणे नव्याने साकारत असलेले प्रवाह यांचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर होणार आहे; परंतु शिक्षणक्षेत्रावरील परिणाम हा जास्त महत्त्वाचा असेल.