harish rana
sakal
हरीश राणाची सोडवणूक करणारा हा निकाल भारतातला पहिलाच आहे. इच्छामरणाच्या संकल्पनेकडे अधिक उदार मनाने आणि तार्किक होऊन पाहिले पाहिजे, ही काळाची गरजच आहे.
जगणे सुंदर असतेच, पण काही वेळा मृत्यू हा देखील असोशीने भेटावा असा सखा वाटू लागतो. पण त्याच्या भेटीलागी बरेच खटाटोप करावे लागतात. हरीश राणासारख्या दुर्दैवी कहाणीचा शेवट व्हावा, ही इच्छादेखील माणुसकीच्या धर्माला जागणारीच आहे. तिचा यथोचित सन्मान व्हायला हवा.