

The Intersection of International Politics and Cricket Diplomacy
sakal
खेळ आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात दोन देशांदरम्यानचे शत्रुत्व फार काळ टिकत नाही. गेल्या पाच दशकांपासून भारत आणि पाकिस्तानदरम्यान होणाऱ्या क्रिकेट सामन्यांत द्वेष आणि पैशांच्या आकर्षणाच्या परस्परविरोधाचा प्रत्यय अनेकदा आला आहे. त्याचे सूूत्रसंचालन क्रिकेट नियामक मंडळात बसलेल्या आपल्या मोहऱ्यांच्या माध्यमातून राज्यकर्ते पडद्याआडून करीत असतात. मैदानातील सामने जिंकण्यापेक्षा सत्तेचे राजकारण महत्त्वाचे ठरते, तेव्हा स्पर्धा आणि मालिका रद्द होतात.