
तंत्रज्ञानाचा विलक्षण वेगाने होत असलेला विकास त्याचे उपयोजन आणि त्या वेगाशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नातील नियमनाची व्यवस्था हे चित्र बहुतेक देशांत दिसते आहे. भारताने विदा संरक्षण कायद्यासाठी तयार केलेली नियमावली हादेखील अशा प्रयत्नांचा एक भाग आहे. त्यातील एक ठळक भाग म्हणजे अठरा वर्षांखालील मुलामुलींना समाजमाध्यमांतील अनिष्ट गोष्टींपासून दूर ठेवण्याची तरतूद. प्रस्तावित नियमांचे कायद्यात रूपांतर झाले तर हाती स्मार्टफोन असलेल्या अठरा वर्षांखालील मुलामुलींसाठी आजवर सताड उघडी असलेली समाजमाध्यमांची दारे इथून पुढे सहजासहजी उघडली जाणार नाहीत. स्मार्टफोनच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम सर्वत्र दिसून येत आहेत.