india women's cricket team world cup win
sakal
भारताच्या महिलांच्या क्रिकेट संघाने विश्वकरंडक जिंकून जो पराक्रम गाजवला, तो १९८३ च्या कपिल देवच्या संघाइतकाच, किंवा खरे तर त्यापेक्षा कैक पटींनी अधिक मोलाचा आहे.
एकशेबारा वर्षापूर्वी केरळातल्या कोट्टयम गावात बेकर्स शाळेच्या पटांगणात मुख्याध्यापिका ॲन केलवेबाईंनी मुलींना क्रिकेटच्या खेळातला पहिला चेंडू टाकायला लावला. या केलवेबाईंनी क्रिकेट कंपल्सरीच केले होते, आणि त्या पहिल्या चेंडूनिशी भारतीय महिला क्रिकेटचा जन्म झाला होता. त्यानंतर रविवारी संध्याकाळी थेट नवी मुंबईत महिला क्रिकेटविश्वातली ती सोनेरी पहाट उगवली.