
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला, ही स्वागतार्ह बाब आहे.
भारतीय संघराज्यव्यवस्था ज्या लोकशाही मूल्यांच्या आधारावर उभी आहे, तिचा पाया हा स्थानिक स्वराज्य संस्था असतात. लोकांचा थेट, दैनंदिन संबंध ज्या यंत्रणांशी येतो त्या प्रामुख्याने स्थानिक स्वराज्यस संस्थांच्या अखत्यारीत येतात. लोकांच्या प्रतिनिधींमार्फत तेथील कारभार चालवला जातो. तोच नेमका आपल्याकडे बऱ्याच काळ ठप्प झाला.