Maharashtra Assembly Election 2024sakal
editorial-articles
अग्रलेख : लोकशाहीचा उत्सव
निवडून येणारे सरकार आपल्या आशाआकांक्षांचे प्रतिनिधित्व करेल या आशेवर पाच वर्षे काढली जातात. त्यामुळे योग्य व्यक्ती निवडून येतील, याची जबाबदारी नागरिकांनी पार पाडायची असते.
निवडून येणारे सरकार आपल्या आशाआकांक्षांचे प्रतिनिधित्व करेल या आशेवर पाच वर्षे काढली जातात. त्यामुळे योग्य व्यक्ती निवडून येतील, याची जबाबदारी नागरिकांनी पार पाडायची असते.
राजकीय पक्ष, त्यांचे नेते यांचे म्हणणे गेले काही महिने आपण ऐकले, आता मतदारांना म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना त्यावर काय म्हणायचे आहे, हे आज (बुधवारी) नोंदवले जाणार आहे. पाच वर्षांनी येणारी ही संधी गमावणे योग्य होणार नाही, त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपले कर्तव्य बजावले पाहिजे. लोकशाहीत मतदानाची सक्ती नसते.

