marathwada heavy rain flood water
sakal
मराठवाड्याच्या नशिबी दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. यंदा संकटाचे स्वरूप बदलले, पण हलाखीचे प्राक्तन बदलले नाही. प्रचंड पावसाने शेतकरी अक्षरशः कोलमडला. त्यांना उभे करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
मराठवाड्याच्या नशिबी एकतर दुष्काळ, नाहीतर अतिवृष्टी, हे दुष्टचक्र सुरूच आहे. निसर्गाचा कोप या प्रदेशात असतोच. त्यात भर म्हणजे सरकारी अनास्था. विकासाचा गजर, योजनांचा गाजावाजा, अनुशेषाचे राजकारण आणि घोषणांच्या आतषबाजीत कित्येक वर्षे लोटली आहेत. पण मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अनिश्चिततेचा काळोख सरलेला नाही.