

कायदा-सुव्यवस्थेसाठीचे सुरक्षात्मक उपाय हे परिस्थिती नियंत्रणात आणतात; पण प्रश्न मुळापासून निपटण्याचे काम ‘विचार’ आणि ‘समतोल विकास’च करू शकेल.
तब्बल अकरांपेक्षा अधिक राज्यांमध्ये विस्तार असलेली अन् साठी ओलांडून गेलेली हिंसक नक्षलवादी चळवळ शेवटच्या घटका मोजू लागली असे चित्र निर्माण झाले आहे. प्रखर इच्छाशक्ती असेल तर कठीण उद्दिष्टही कसे पार पाडता येते, याचे हे उदाहरण.