नअस्कार! मी अत्तिशय रागावलेली आहे. भाषाविज्ञान या विषयाकडे एखाद्यानं किती दुर्लक्ष करायचं, याला काही लिमिट?
मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मी ‘सोस्यूर ते चॉम्स्की’ या प्रा. मिलिंद मालशेलिखित भाषाविज्ञानविषयक ग्रंथाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गेले होत्ये. तिथं मला कळलं की भाषाविज्ञान मराठी भाषेत शिकवण्याची सोय महाराष्ट्रात जवळजवळ नाहीच. ज्याअर्थी ती महाराष्ट्रात नाही, त्याअर्थी ती केरळ, सिक्किम, उत्तर प्रदेश वगैरे ठिकाणीही नसणारच.
काय हे?