अग्रलेख : वेदनेची दोन रूपे

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा घाव जम्मू-काश्मीर राज्याच्या किती वर्मी बसला आहे, याचे दर्शन जम्मू-काश्मीर विधानसभेच्या विशेष अधिवेशनात घडले.
omar abdullah
omar abdullahsakal
Updated on

फुटीरतावाद आणि दहशतवादाचा खात्मा करायचा असेल तर जनतेची साथ अत्यंत महत्त्वाची आहे, यावर उमर अब्दुल्ला यांनी दिलेला भर महत्त्वाचा आहे.

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा घाव जम्मू-काश्मीर राज्याच्या किती वर्मी बसला आहे, याचे दर्शन जम्मू-काश्मीर विधानसभेच्या विशेष अधिवेशनात घडले. या भागाची सारी अर्थव्यवस्था ज्या पर्यटनावर अवलंबून आहे, त्यावरच या हल्ल्याने मोठा आघात केला असल्याने सर्वच लोकप्रतिनिधींच्या मनावरील ताण या अधिवेशनात जाणवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com