

Unmasking the March: The Real Story Behind the Agitation
Sakal
मुंबईत महाविकास आघाडीने काढलेल्या मोर्चाच्या निमित्ताने राज्यातील राजकारणाच्या सद्यःस्थितीचे दर्शन झाले. मोर्चाच्या निमित्ताने का होईना या आघाडीतील घटक पक्षांमधील एकतेचा धागा दृश्यमान झाला, पण त्याचबरोबर धोरण आणि शैलीतील फरकही स्पष्ट झाला. दोन्ही ‘सेनां’बरोबर जाताना काँग्रेसचे अवघडलेपण लपून राहात नव्हते. आंदोलकांचा मुख्य रोख निवडणूक आयोगावर असताना महायुतीने मूकमोर्चा काढून अनावश्यक प्रतिक्रिया दिली. थोडक्यात राजकीयदृष्ट्या अत्यंत प्राथमिक मुद्द्यावर म्हणजे मतदारयाद्यांच्या प्रश्नांवरूनच आंदोलने करावी लागणे आणि सत्ताधाऱ्यांनीही त्याकडे केवळ राजकीय सोईच्या चष्म्यातून पाहणे ही बाब राजकीय प्रक्रियेच्या बाबतीत महाराष्ट्राचे चाचपडणे कसे चालू आहे, हे दर्शवणारी आहे.