आपल्याला मिळत असलेले महत्त्व दुसऱ्याच्या राजकारणाचा भाग आहे, याचे भान न ठेवता पाकिस्तानी लष्करप्रमुख आपल्या बेटकुळ्या फुगवून दाखविण्याचे प्रयोग करू लागले आहेत.
सध्याच्या अनिश्चित अशा जागतिक परिस्थितीत एखाद्या आर्थिकदृष्ट्या जर्जर झालेल्या देशाच्या लष्करप्रमुखाने भारताला अण्वस्त्रांची धमकी देणे, एवढेच नव्हे तर अर्धे जग नष्ट करण्याची भाषा करणे, हे रोगट मानसिकतेचे लक्षण म्हणावे लागेल.