Marathi language crisis
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठीतून बोलणे अनिवार्य करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. इतरही समाजघटकांपर्यंत मराठीचा जागर पोचायला हवा.
मराठी भाषेच्या गौरवाचे हुंकार फक्त संमेलनांच्या मंडपांतून, काही पक्ष वा संघटनांच्या मेळाव्यांतून उमटत असले तरी कोणत्याही भाषेचे टिकणे आणि बहरणे अवलंबून असते ते दैनंदिन व्यवहारांमध्ये त्या भाषेचा वापर कसा आणि किती होतो, यावर. पण राज्याच्या राजधानीतच याबाबतीत मोठे प्रश्नचिन्ह आहे. खरे तर मराठी माणसाची, भाषेची मान ताठ ठेवायची असेल तर राज्यात मराठीचा डंका कायम वाजवत ठेवण्याची आवश्यकता भासते आहे. राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयाची त्यामुळेच दखल घ्यायला हवी.